Skip to main content

Posts

Showing posts from 2020

पुस्तकाचा आढावा - फकिरा

                                               Source : Google पुस्तक : फकिरा लेखक : अण्णाभाऊ साठे प्रकाशन वर्ष : 1959 पुस्तक प्रकार : कादंबरी (स्मृतिपर) मूळ किंमत :120/- पुस्तक पृष्ठ व प्रकाशक: 145 , सुरेश एजनसी अण्णाभाऊंचे साहित्य : तब्बल 32 कादंबऱ्या, 20 कथासंग्रह, जवळपास दोन डझन पोवाडे, तितकेच लोकनाट्य / तमाशे, कित्येक लावण्या व इतर किरकोळ लेखन. "फकिरा" ही कादंबरीचे भारतीय भाषांबरोबर रशियन, झेक, पोलिश, जर्मन या भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. सोबतच "फकिरा"ला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरवले आहे. लेखकाबद्दल माहिती :         अण्णाभाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 - 28 जुलै 1969) यांना फक्त 49 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील अखेरची तीन दशके त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची होती. सांगली जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात (वाटेगाव) व गावकुसाबाहेर ठेवलेल्या मांग(दलित) समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण मिळाले ते जेमतेम अक्षर ओळख ...

होमो देअस (Homo Deus) - Book Review

                              Source : Google पुस्तकाचा आढावा (Book Review) पुस्तक : होमो देअस (Homo Deus) लेखक : युवाल नोवा हारारी (इस्राईल) प्रकाशन वर्ष : 2016 पुस्तक कोणकोणत्या भाषेत उपलब्ध : मूळ पुस्तक इंग्रजीमध्ये असून ते मराठी, हिंदी, तमिळ व भारतातील आणि जगातील इतर मुख्य भाषांमध्ये उपलब्ध आहे पुस्तकाचा प्रकार : वैज्ञानिक-इतिहासपर +मानववंशशास्त्र लेखका बद्दल : युवाल नोवा हरारी हे 44 वर्षांचे इस्राईल या देशाचे नागरिक असून आजच्या युगातील तरुण, प्रौढ आणि जगातील वाचकांचे प्रिय लेखक म्हणून नाव लौकिक मिळवलेले आहे. सद्या ते हिब्रू विद्यापीठ, इस्राईल इथे इतिहासाचे प्राध्यापक असून सोबतच ते लिखाण सुद्धा करतात. त्यांचे सर्वात नावाजलेले व करोडो लोकांनी वाचलेली  "सेपियन्स (Sapiens)" हे पुस्तक सर्वांच्या ओळखीचे  असेलच (नसेल तर नक्की वाचाल).  सोबतच त्यांचे "होमो देअस" नंतर " 21व्या शतकासाठी 21 धडे / 21 lessons for 21 century" हे सुद्धा खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. हरारी यांचे वैचारिक व मार्गदर्शक गुरू जगप्...

"हीच का स्त्री "......

सगळे कामे आटोपली आणि मी नेहमीप्रमाणे आपला मोबाईल बघत बसले होते.... प्रिया आहे का ???? आवाज आला म्हणून मी वर बघितले. त्यांच्याजवळ उठून गेले आणि त्यांना सांगितले.... या ना काकू घरात... ती बाहेर गेलीय, येईलच एवढ्यात.... मी औपचारिकता पार पाडली. आणि त्यांच्याकडे बघत स्मित देत मी परत मोबाईल मध्ये बघू लागली..... काय करतेय मोबाईल मध्ये....... मी मान वर केली आणि त्यांना सांगितले.... काही नाही काकू, फ्रेंड शी बोलतेय..... माझं नजर जरी मोबाईल मध्ये असली तरी माझे लक्ष त्या काकूंच्या हालचालीवर होते.... एक हात दुसऱ्या हातात दाबत, पायाला उगाच झटके देत होत्या. मी मुद्दामच त्यांना म्हणाले, खूप महत्वाचे काम होते का तिच्याकडे???? नाही नाही..... अगदीच फार नाही पण.... हा काकू मी फोन केला असता पण तिने मोबाईल घरीच ठेवलाय..... काही हरकत नाही, मी बसेल.... मी ओळख नसतांनाही त्यांच्याकडे बघून स्मित देत होती पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ सुरू होता.... काकू, काही बोलायचं आहे का????? खर तर हो, मी असं ऐकलय की तू...... मी मोबाईल बाजूला ठेवला आणि त्यांना परत म्हणाले, काय ऐकलय..... तू लिहतेस ना.. . हो, म्हणजे थोडं...

दोघी...

सायंकाळची वेळ होती. वीर पुस्तक वाचत बसला होता. त्याच पुस्तकात मस्त मन लागलं होतं, कारण पुस्तक विरच्या आवडत्या लेखकाचं होते. तितक्यात मोबाईलवर फोन आला म्हणून विरच लक्ष विचलित झालं. पाहिलं तर काय, चक्क रेवाने कॉल केला होता. तशी रेवा विरची खूप जवळची आणि जिगरी मैत्रीण आहे, तरी त्यांना शेवटचं बोलून दोन महिने झाले होते. वीर ने फोन उचलला अन बोलायला सुरवात केली. हॅलो, बोला मॅडम. आज दिवस दक्षिणेकडून निघाला वाटतं. नाही रे तस काही, तुम्हीच वाट चुकलात. आम्हाला विसरले तुम्ही, म्हणून म्हटले आपणच फोन कराव.... रेवा बोलली. पाठीमागे का हटाव म्हणून वीर ने पण गुगली टाकली. वाट नेमकी कुणाची चूकली ते पाहाव लागेल ? भविष्याचा वेध घेत घेत मिळालं वाटत एकदाचं तुमचं भविष्य. ए गप्प रे, उठ सुट तू मला का बोहल्यावर चडवायच्या घाईमध्ये असतो??? अग तस नाही रे,  तुझा घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले वाटते ना ?...  म्हणून म्हणलो बाकी काही नाही... त्यांनी सुरू केले पाहायला, मार्केटमध्ये मोठं मोठाले लोक मोठं मोठ्या बोल्या (हुंडा) लावत आहेत. मला कोरोना बाबा पावला म्हण... सगळ्यांच बाहेर निघणे बंद झाले...आणि ...

स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण

  Source: shutterstock.com           Article published Date : 16 Feb 2020               Article republish Date : 27 Aug 2020  (टीप: ज्या शब्दांच रंग बदलला त्यात माहितीच्या लिंक आहेत त्या वर क्लिक करून पाहू शकता!) ज्या महाराष्ट्र राज्यातून स्त्रीमुक्तीच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली त्याच राज्यात  भर दिवसा दोन महिलांना जिवंत जाळण्यात आले आणि त्यात त्या दोघींचाही मृत्यू झाला , आणि मागील 10 दिवसात 5 मुलींवर तेजाब(Acid Attack) फेकण्याचा घटना घडल्यात. नाही का ह्या लाजिरवण्या घटना ? जेंव्हा जेंव्हा स्त्रिया स्वबळावर समाजानी लादलेल्या अनिष्ट रूढी जश्या की, फक्त चुल आणि मूल ह्या पल्याड जाऊच नये, स्त्रीने शिकून काय करणार ? अश्या परंपरा मोडीत काडून वर येऊ पाहत आहेत, तेंव्हा तेंव्हा असले  विकृत-पुरुषी  मानसिकता असणारे पुरुष त्यांच्यावर शारीरिक व मानसिक  आघात करतात व त्यांची प्रगती थांबवण्यासाठी आतोणात प्रयत्न करतात. स्त्री समानतेच्या गोष्टी जे बोलताना दिसतात, त्यांच्या स्वतःच्या घरातील स्त्रील...